Sunday, March 31, 2019

संस्कृती नावाच्या विद्यापीठाची आई अनभिषिक्त कुलगुरु:-
                      श्री गणपत शिर्के सर.
☘☘☘☘☘☘☘
"आई "पुस्तिकेचे  मान्यवरांच्या शुभहस्ते उत्साहात प्रकाशन.
@@@@@@@@@@@











शिक्षण नसतानाहि विचारांनी सुशिक्षित व आधुनिक असणा-या साध्या,सरळ,सात्विक ,प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या स्वर्गीय रुक्मिणीबाई महादेव लाड यांचा विचारांचा स्मृतीगंध "आई" पुस्तिकेच्या माध्यमातून समाजामध्ये दरवळत राहिल असे प्रतिपादन लांजा हायस्कुलचे मुख्याध्यापक गणपत शिर्के यांनी व्यक्त केले.

      वात्सल्यमूर्ती स्वर्गीय श्रीमती रूक्मिणीबाई महादेव लाड यांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमानिमित्त स्वर्गीय रूक्मिणीबाई महादेव लाड यांच्या विचारांचा स्मृतीगंध जपण्यासाठी "आई" विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक २९ मार्च २०१९ रोजी उत्साहात झाले.यावेळि ते बोलत होते.यावेळि शिर्के सर म्हणाले सर्व प्राणीमात्रांमधील आईच्या ठिकाणी असणा-या जन्मजात गुण,व्यवहारज्ञान,दूरदृष्टी,समयसूचकता,निर्णयक्षमता इत्यादी गोष्टिंचा विचार केला तर ,आई ही केवळ हाडामांसाची व्यक्ती नसून संस्कृती नावाच्या विद्यापीठाची अनभिषिक्त कुलगुरु असते,असं म्हटलं तर वावगं होणार नाहि.स्वर्गीय आक्कांनी आपल्या मुलांना संघर्ष करुन उच्च शिक्षण देताना सुसंस्कारित केलेच त्याबरोबर सामाजिक भानहि दिले,यामुळेच आक्का इतरांपेक्षा वेगळ्या ठरल्या असे शिर्के सर म्हणाले. यावेळि व्यासपीठावर ओणी हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री महादेव पाटील सर,उमेश केसरकर,सुभाष लाड,विजय हटकर,विजय लाड,रामदास पांचाळ,दीपक नागवेकर,इम्तियाज सिद्दिकि ,विजय तोडकरि आदि मान्यवर उपस्थित होते.
      रिंगणे ता.लांजा येथील सुप्रसिद्ध कवी श्री सुभाष लाड यांच्या मातोश्री श्रीमती रूक्मिणीबाई महादेव लाड यांचे गेल्या वर्षी १० मार्च २०१८ रोजी निधन झाल्यानंतर आपल्या आईचा संस्काररुपी स्मृतीगंध जपण्यासाठी लाड कुटुंबियांनी लांजा तालुक्यातील पाच शाळांना एलईडि प्रोजेक्टर संच भेट दिले होते.याही वर्षी श्रीमती रूक्मिणीबाई महादेव लाड यांच्या  प्रथम स्मृतीदिनाचे ऒचित्य साधून "आई" या श्री विजय हटकर व श्री सुभाष लाड यांनी संपादित केलेल्या  पुस्तिकेचे प्रकाशन व जिल्हास्तरिय काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांच्या सत्कार व पारितोषिक प्राप्त कविंच्या कवितांच्या माध्यमातुन स्वर्गीय आक्कांना काव्यांजली अर्पण करण्यात आलई.."आई " या पुस्तिकेची  ग्रंथमित्र प्रकाशन मुंबई  व माझी मायभूमी प्रतिष्ठान ,मुंबई च्या वतीने निर्मिती करण्यात आली आहे.
       
      यावेळि सिमरन शेख ,निवेदिका माईल,रोशनी तोडकरि,शिल्पा लांजेकर,अभिज्ञा कदम,भाग्यश्री संसारे,दीपक नागवेकर,रामदास पांचाळ,उमेश केसरकर ,दिलिप चव्हाण ,इम्तियाज सिद्दिकि,स्नेहा डोंगरे आदि कविंनी आईविषयक कवितांचे वाचन करुन स्वर्गीय आक्कांना काव्यांजली अर्पण केली. जिल्हास्तरिय काव्यलेखन स्पर्धेचे परिक्षक उमेश केसरकर यांनी काव्य लेखनातील बारकावे सांगत आपल्या आईच्या विचारांचा वारसा जपणा-या लाड कुटुंबियांचे भरभरुन कॊतुक केले. ओणी हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री महादेव पाटील यांनी गावखेड्यात राहुन जातीपलीकडचं मानव्य जोपासणा-या आक्कानी मानवतावादाचे संस्कार आपल्या मुलांवर केले.त्यांचे संस्काराचे फलित   सुभाष लाड सरांच्या माध्यमातुन आपल्या समोर आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत सुभाष लाड यांनी आक्कांचे चरित्र पुस्तकाच्या रुपाने जगासमोर मांडणा-या पुस्तकाचे लेखक विजय हटकर यांचे आभार मानले.व आक्कांची जीवनगाथा उपस्थितांसमोर मांडली.

आपल्या पूर्वजांच्या स्मृती जोपासण्यासाठी फक्त वर्षश्राद्ध किंवा म्हाळवसात जेवणाच्या भोजनावळी घालतानाच त्यांच्या विचारांचा वारसा जोपासत विधायक, समाजपयोगी कार्य केले पाहिजे असा संदेश लाड कुटुंबीय या माध्यमातून देत असल्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे मान्यवरांकडून कॊतुक होत आहे. यावेळी
वात्सल्यमूर्ती स्व.श्रीमती रूक्मिणीबाई महादेव लाड यांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रम व त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन आणि पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहिल्याबद्दल  लाड कुटंबीयांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले .कार्यक्रमाचे निवेदन श्री विजय हटकर यांनी केले.

No comments:

Post a Comment