Sunday, March 31, 2019

फाफे गुरुजी व सुभाष लाड
गुरु-शिष्याची वेगळी जोडगोळी.
🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮

सस्नेह नमस्कार.
   🖋  आमचे मार्गदर्शक श्री  सुभाष लाड यांच्या सेवापुर्ती समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी आडवली येथे शनिवार दिनांक २९ मार्च रोजी  रात्री ८:३० ला पोहचलो. लाड सरांना  बालपणी ज्ञानदान करणारे ,सुसंस्काराचे धडे देणारे आडवली ता.लांजा येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री शिवराम फाफे यांची भेट घेतली.व आपले विद्यार्थी सुभाष लाड हे अापल्या विचारांचा वारसा पुढे चालवित एक यशस्वी शिक्षक म्हणून ०२ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत हि बातमी सांगितली. सरांच्या कार्याचा गॊरव म्हणून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला यायचे आहे हे सांगताच त्यांचे डोळे पाणावले.पाणावलेल्या डोळ्यांना सावरत मग फाफे गुरुजींनी १९७० च्या दशकातील रिंगणे गावातील त्यांच्या १३ वर्षाच्या शिक्षकी वाटचालीतील आठवणींना उजाळा दिला.एक -एक म्हणत मग अनेक आठवणींची मग फाफे गुरूजींनी केलेल्या चहा सोबत "चाय पे चर्चा" झाली.
    १९७० च्या काळातील रिंगणे गावातील ग्रामव्यवस्था, शैक्षणिक,सांस्कृतिक चळवळ त्यांच्या बोलण्यातून पुढे आली.
१) फाफे गुरुजींच्या काळातच रिंगणे हनुमान मंदिराच्या परिसरातील प्राथमिक शाळेच्या  इमारतीची पायाभरणी झाली.
२) फाफे गुरूजी गावात होणाऱ्या नाटकांचे नेपथ्य जबाबदारिसोबत पडदेहि उत्कृष्ट रंगवायचे.
३) रात्री हि मुलांना आपल्या खोलीत जमवून शिकवायचे.
४)वाहतूक व्यवस्था नसल्याने फाफे गुरुजी पायी चालतच आडवलीहून रिंगण्याला यायचे व सुट्टीला गावी आडवलीला जायचे.

४) गावात कोण आजारि पडला तर त्या रुग्णाला डोलीत बसवून जवळच्या पाचल, रायपटण येथील वैद्यकीय अधिका-याकडे नेण्याच्या कामीही फाफे गुरुजी आघाडिवर.
५) मुलांना शिकवायला आलेले फाफे गुरुजी १३ वर्षे रिंगणे गावात गावाचेच होऊन राहिल्याने गावातील ग्रामस्थांची  फाफे गुरुजींवर प्रचंड श्रद्धा होती
त्यामुळे गावचे न्यायनिवाडे, विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजनात फाफे गुरुजींचे मार्गदर्शन हमखास घेतले जात होते.
६) रिंगणे गावातील अनेक मुलांना तिमीराकडुन तेजाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणाऱ्या फाफे गुरूजीमुळेच सुभाष लाड यांचे माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले कारण दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी फाफे गुरुजीच सुभाष लाड यांना शिपोशी येथील न्यायमूर्ती आठल्ये विद्यामंदिरात घेऊन गेले होते.
७)रिंगणे शाळेत फाफे गुरुजींनी १९७८ मध्ये शारदोत्सव सुरू केला होता.सुभाष लाड शिपोशी येथे दहावीनंतर पुढिल शिक्षणाला गेल्यानंतर रिंगण्यातील उंबरवाडी शाळेतील शारदोत्सव बंद झाला.हे कळताच सुभाष लाडांनी लेखक श्री वसंत जाधव यांची "इथे बायका मिळतात" हे खळबळ माजविणारे नाव असलेली एकांकिका दिग्दर्शित करुन  बसविली त्याचा यशस्वी प्रयोग केला.व पुन्हा यशस्वीपणे शारदोत्सवाला सुरवात केली याकामी फाफे गुरुजींनी सुभाष लाड यांना तोलामोलाची साथ दिली.या कार्यक्रमाची पत्रिका, पोस्टर फाफे गुरुजींनी स्वत: तयार केली.लांजा येथून या कार्यक्रमाची पत्रिका स्वखर्चाने छापून आणली.
महारथी कर्ण हि पहिली एकांकिका बसवून सुभाष लाड यांना अभिनयाचा पहिला रंग फाफे गुरुजींनीच फासला.त्यामुळेच पुढे व्यासपीठावरील आत्मविश्वास,धैर्य,वक्तृत्व, अभिनय,इत्यादि गुण लाड यांच्यात विकसित झाले.
८) रिंगणे येथील सुभाष लाड यांच्या घराच्या भूमीपुजनाला फाफे गुरुजी उपस्थित होते.

९) लाड सरांशी जेव्हा जेव्हा बोलणे होते त्यावेळी कृतज्ञतापूर्वक फाफे गुरुजींचा उल्लेख त्यांच्या मुखातून येतो.
आज प्रत्यक्ष भेट घेता आल्याने आनंद प्राप्त झाला. फाफे गुरुजींच्या शेजारचे तळवडे हे माझे गाव असल्याने माझ्या घरातील सर्व जेष्टांना ते ओळखतात.  घरातून निघताना त्यांच्या चरणाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला.
व लाड सरांच्या कार्यक्रमाला नक्की यायचं आहे असं आग्रहाचं निमंत्रणहि दिलं.
त्यांच्या घरातून बाहेर पडलॊ तेव्ह रात्रीचे ९:३० झाले होते.
१०) लाड सर यांच्या सेवापूर्ती समारंभात माझी मायभूमी प्रतिष्ठान, मुंबई च्या वतीने सुभाष लाड यांना घडविणा-या श्री शिवराम फाफे गुरुजी यांचा अमृत महोत्सव उतसाहात साजरा करण्यात येणार आहे.ज्या समाजात एखादी व्यक्ती अमृतमहोत्सवी वर्ष पुर्ण करते याचा अर्थ तो समाजहि निरोगी आहे असाच होतो.व त्या निरोगी समाजाचा आपणहि एक घटक आहोत हि भावना वाढीस लागते.शरिरांने व विचारांनी निरोगी असणाऱ्या फाफे गुरूजींचा ह्रदयस्थ सत्कार यावेळी केला जाणार आहे.तरि आपण सर्वांनी श्री सूभाष लाड सर सेवापूर्ती कार्यक्रमासाठी नक्कीच यायचं आहे.

सृजनहो,

गुरू-शिष्याचं पवित्र नातं आपणहि जोपासलं पाहिजे.
आपल्याला घडविणा-या गुरुंविषयी कृतज्ञता भाव दाखविला पाहिजे.आपल्या व्यक्तीमत्वाला आकार देणा-या प्रत्येक मार्गदर्शकाचं स्मरण आयुष्यभर ठेवलं पाहिजे.त्यांनी दाखविलेल्या पगडंडीवरुन पुढे चालत विधायक कार्याचा महामार्ग निर्माण करायला हवा.
७६ वर्षाचे गुरु श्री शिवराम श्रीपाद फाफे गुरुजी व ५८ वर्षीय विद्यार्थी सुभाष लाड सर यांच्या गुरु-शिष्य संबंधातून हेच  अनुकरणीय ज्ञान आत्मसात करायला हवं।
      
   श्री विजय हटकर
   २९/०३/२०१९
   वेळ:-२३:४०
संस्कृती नावाच्या विद्यापीठाची आई अनभिषिक्त कुलगुरु:-
                      श्री गणपत शिर्के सर.
☘☘☘☘☘☘☘
"आई "पुस्तिकेचे  मान्यवरांच्या शुभहस्ते उत्साहात प्रकाशन.
@@@@@@@@@@@











शिक्षण नसतानाहि विचारांनी सुशिक्षित व आधुनिक असणा-या साध्या,सरळ,सात्विक ,प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या स्वर्गीय रुक्मिणीबाई महादेव लाड यांचा विचारांचा स्मृतीगंध "आई" पुस्तिकेच्या माध्यमातून समाजामध्ये दरवळत राहिल असे प्रतिपादन लांजा हायस्कुलचे मुख्याध्यापक गणपत शिर्के यांनी व्यक्त केले.

      वात्सल्यमूर्ती स्वर्गीय श्रीमती रूक्मिणीबाई महादेव लाड यांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमानिमित्त स्वर्गीय रूक्मिणीबाई महादेव लाड यांच्या विचारांचा स्मृतीगंध जपण्यासाठी "आई" विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक २९ मार्च २०१९ रोजी उत्साहात झाले.यावेळि ते बोलत होते.यावेळि शिर्के सर म्हणाले सर्व प्राणीमात्रांमधील आईच्या ठिकाणी असणा-या जन्मजात गुण,व्यवहारज्ञान,दूरदृष्टी,समयसूचकता,निर्णयक्षमता इत्यादी गोष्टिंचा विचार केला तर ,आई ही केवळ हाडामांसाची व्यक्ती नसून संस्कृती नावाच्या विद्यापीठाची अनभिषिक्त कुलगुरु असते,असं म्हटलं तर वावगं होणार नाहि.स्वर्गीय आक्कांनी आपल्या मुलांना संघर्ष करुन उच्च शिक्षण देताना सुसंस्कारित केलेच त्याबरोबर सामाजिक भानहि दिले,यामुळेच आक्का इतरांपेक्षा वेगळ्या ठरल्या असे शिर्के सर म्हणाले. यावेळि व्यासपीठावर ओणी हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री महादेव पाटील सर,उमेश केसरकर,सुभाष लाड,विजय हटकर,विजय लाड,रामदास पांचाळ,दीपक नागवेकर,इम्तियाज सिद्दिकि ,विजय तोडकरि आदि मान्यवर उपस्थित होते.
      रिंगणे ता.लांजा येथील सुप्रसिद्ध कवी श्री सुभाष लाड यांच्या मातोश्री श्रीमती रूक्मिणीबाई महादेव लाड यांचे गेल्या वर्षी १० मार्च २०१८ रोजी निधन झाल्यानंतर आपल्या आईचा संस्काररुपी स्मृतीगंध जपण्यासाठी लाड कुटुंबियांनी लांजा तालुक्यातील पाच शाळांना एलईडि प्रोजेक्टर संच भेट दिले होते.याही वर्षी श्रीमती रूक्मिणीबाई महादेव लाड यांच्या  प्रथम स्मृतीदिनाचे ऒचित्य साधून "आई" या श्री विजय हटकर व श्री सुभाष लाड यांनी संपादित केलेल्या  पुस्तिकेचे प्रकाशन व जिल्हास्तरिय काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांच्या सत्कार व पारितोषिक प्राप्त कविंच्या कवितांच्या माध्यमातुन स्वर्गीय आक्कांना काव्यांजली अर्पण करण्यात आलई.."आई " या पुस्तिकेची  ग्रंथमित्र प्रकाशन मुंबई  व माझी मायभूमी प्रतिष्ठान ,मुंबई च्या वतीने निर्मिती करण्यात आली आहे.
       
      यावेळि सिमरन शेख ,निवेदिका माईल,रोशनी तोडकरि,शिल्पा लांजेकर,अभिज्ञा कदम,भाग्यश्री संसारे,दीपक नागवेकर,रामदास पांचाळ,उमेश केसरकर ,दिलिप चव्हाण ,इम्तियाज सिद्दिकि,स्नेहा डोंगरे आदि कविंनी आईविषयक कवितांचे वाचन करुन स्वर्गीय आक्कांना काव्यांजली अर्पण केली. जिल्हास्तरिय काव्यलेखन स्पर्धेचे परिक्षक उमेश केसरकर यांनी काव्य लेखनातील बारकावे सांगत आपल्या आईच्या विचारांचा वारसा जपणा-या लाड कुटुंबियांचे भरभरुन कॊतुक केले. ओणी हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री महादेव पाटील यांनी गावखेड्यात राहुन जातीपलीकडचं मानव्य जोपासणा-या आक्कानी मानवतावादाचे संस्कार आपल्या मुलांवर केले.त्यांचे संस्काराचे फलित   सुभाष लाड सरांच्या माध्यमातुन आपल्या समोर आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत सुभाष लाड यांनी आक्कांचे चरित्र पुस्तकाच्या रुपाने जगासमोर मांडणा-या पुस्तकाचे लेखक विजय हटकर यांचे आभार मानले.व आक्कांची जीवनगाथा उपस्थितांसमोर मांडली.

आपल्या पूर्वजांच्या स्मृती जोपासण्यासाठी फक्त वर्षश्राद्ध किंवा म्हाळवसात जेवणाच्या भोजनावळी घालतानाच त्यांच्या विचारांचा वारसा जोपासत विधायक, समाजपयोगी कार्य केले पाहिजे असा संदेश लाड कुटुंबीय या माध्यमातून देत असल्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे मान्यवरांकडून कॊतुक होत आहे. यावेळी
वात्सल्यमूर्ती स्व.श्रीमती रूक्मिणीबाई महादेव लाड यांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रम व त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन आणि पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहिल्याबद्दल  लाड कुटंबीयांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले .कार्यक्रमाचे निवेदन श्री विजय हटकर यांनी केले.