Sunday, June 26, 2022

महाराष्ट्र साहित्य परिषद लांजा शाखेचे उद् घाटन उत्साहात संपन्न.

 महाराष्ट्र साहित्य परिषद लांजा शाखेचे उद् घाटन उत्साहात संपन्न.


 समाजाने साहित्यभिमुख होण्याची गरज.                                                   - प्राध्या.मिलिंद जोशी


 लांजा  :-- 



 वाचनसंस्कृतीपासून दुर चाललेल्या लोकांपर्यंत साहित्य पोहचविण्यासाठी समाजानेच आता साहित्यभिमुख होण्याची गरज असून समाजात सगळीकडे पसरलेला झाकोळ मसाप च्या माध्यमातून दूर करुन प्रकाशवाटा दाखवायचे काम आपल्याला करावयाचे आहे  ,असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद ,पुणेचे कार्याध्यक्ष प्राध्या.मिलींद जोशी यांनी लांजा येथे केले.

 


           

       लांज्यातील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवार दि.२५ जुन रोजी सायंकाळी ५:३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेच्या लांजा शाखेचे उद् घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी ते बोलत होते.यावेळी मसाप पुणेच्या कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार, ज्येष्ठ साहित्यिक व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे जिल्हाध्यक्ष डाॅ.तानाजीराव चोरगे ,लोटिस्मा चिपळुणचे माजी अध्यक्ष प्रकाशजी देशपांडे, सुप्रसिद्ध कवी अरुण इंगवले, मसाप शाखा चिपळुणचे अध्यक्ष प्राध्या.संतोष गोनबरे ,लांजा शाखेचे अध्यक्ष विधिज्ञ विलास कुवळेकर आदी  मान्यवर उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेची ओळख  महाराष्ट्रभर व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती देताना समीक्षा संमेलन, विभागीय संमेलन, युवा संमेलन, शिवार संमेलन आदी वैशिष्ट्यपुर्ण संमेलने आयोजित केली जात असून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षाची सन्मानाने निवड होण्यामागे मसाप ची आग्रही भूमिका महत्वपूर्ण ठरल्याचे मत व्यक्त करित लांजा शाखेने लांजा परिसरातील महाविद्यालये, वाचनसंस्कृती निगडीत संस्थांशी अभिसरण करुन मसापच्या माध्यमातून साहित्यिक चळवळ उभारावी असे आवाहन प्राध्या.मिलिंद जोशी यांनी केले.

       


      यावेळी ज्येष्ठ साहित्यीक डाॅ.तानाजीराव चोरगे यांनी  आजच्या पिढीची मराठी भाषाविषयक असलेली अनास्था व्यक्त करताना टी.वी.वरील मराठी मालिकांमधून होत असलेला चुकीचा भाषाप्रचार त्याला कारणीभुत असल्याचे सांगत मसापच्या माध्यमातून  योग्य भाषेचा आग्रहासाठी आपल्याला ठोस पाऊले उचलावी लागतील असे सांगत शिक्षक व पालक वाचतांना दिसले तरच त्यांचे अनुकरण करणारी नवी पिढी वाचनसंस्कृतीकडे वळणार असल्याचे मत व्यक्त केले. यासाठीच स्थानिक प्रतिभेच्या कवडश्यांना योग्य संधी देण्याचे काम करणा-या महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेचा लाभ लांजावासीयांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी लांजा शाखेचे अध्यक्ष - विलास कुवळेकर, उपाध्यक्ष - विजयालक्ष्मी देवगोजी, सचिव -  विजय हटकर, निरंजन देशमुख, डाॅ.राजेश माळी या नव्या कार्यकारीणीला  मान्यवरांच्या शुभहस्ते गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.



    कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत मुंबई ,ठाणे ,पुणे ही साहित्याची प्रकाशबेटे असून यापासून कोसो दूर असलेल्या मात्र साहित्यिकांची समृद्ध परंपरा असलेल्या लांजा तालुक्यात साहित्यदीपाचा छोटा दीप प्रज्वलित व्हावा यासाठीच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेची स्थापना करित असल्याचे सांगत लांज्याच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचा परिचय ॲड.विलास कुवळेकर यांनी उपस्थितांना करुन दिला. यासोबतच मसापच्या कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार आणि कवी अरुण इंगवले यांनी लांजा शाखेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे निवेदन डाॅ.राहूल मराठे यांनी तर आभार विजय हटकर यांनी मानले. कार्यक्रमाला साप्ताहिक आंदोलन चे संपादक गजाभाऊ वाघदरे , जयवंतराव विचारे, डाॅ.महेश बावधनकर,  प्राध्या.धनंजय क्षीरसागर,डाॅ.राजेंद्र शेवडे , डाॅ.जालिंदर लोणके , प्राध्या.ऋषिकेश पाटील , नितीन कदम , प्रकाश हर्चेकर, झोरे ,उमेश केसरकर, डाॅ.माया तिरमारे, राकेश दळवी ,पराग शिंदे ,गुरुप्रसाद सनगर ,आदि साहित्यावर प्रेम करणारी मंडळी उपस्थित होती.

--------------------

मसाप लांजा शाखा उदघाटनसोहळ्याची क्षणचित्रे

दिपप्रज्वलन करताना प्रकाशजी देेेशपांडे

मसाप कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार यांचे स्वागत करताना डाॅ.राजेश माळी.


मार्गदर्शन करताना श्रीमती सुनिताराजे पवार


मार्गदर्शन करताना अरुण इंगवले.


लेखक प्राध्या.संतोष गोनबरेंचे स्वागत करताना कुवळेकर सर.


बहारदार निवेदनकर्ते डाॅ.राहूल मराठे.


आभार मांडताना विजय हटकर.

मान्यवरांसह मसाप लांजा टिम.


मार्गदर्शन करताना डाॅ.चोरगे सर.

डाॅ.तानाजीराव चोरगे दीपप्रज्वलन करताना.


८४ वर्षीय चिरतरुण लेखक संपादक गजाभाऊंची उपस्थिती.


माध्यमसमुहातील दखल :-





Monday, June 13, 2022

विजय हटकर लिखित "जनसेवक सुधाभाऊ " पुस्तकाचे लांजा येथे प्रकाशन

 विजय हटकर लिखित "जनसेवक सुधाभाऊ " पुस्तकाचे लांजा येथे प्रकाशन.



लांजा :- 

       एक आदर्श ग्रामसेवक ग्रामविकासाचा रथ किती उत्तम प्रकारे वाहू शकतो याचा आदर्श उभा करित सरकारी अधिका-यांसमोर जनसेवक सुधाभाऊ पेडणेकर एक मिसाल बनले अाहेत असे कौतुकोद्गार पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी लांजा काढले. 

       

      लांजा शहरातील नवोदित लेखक, पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी लिहिलेल्या "जनसेवक सुधाभाऊ" या पुस्तकाचे शिवस्वराज्यभिषेकाच्या शुभमूहुर्तावर पद्मश्री परशुराम गंगावणे व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष श्री एकनाथजी ढाकणे यांच्या शुभहस्ते प्रकाशन झाले.ग्रामीण भागातील जनतेकडून 'भाऊ' या जवळीक साधणा-या नावाने ओळखले जाणारे ग्रामसेवक गावोगावी कार्यरत असतात.केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक लोकहितार्थ योजना अडीअडचणीतील खेडेगावात आणि सामान्य ग्रामीण जनतेपर्यंत नेणारा तो महत्वाचा दूवा असतो.या पदाचे सामर्थ्य ओळखत ३१ वर्षाच्या सेवेत लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देतानाच सामाजिक बांधिलकी जपणा-या श्री सुधाकर उर्फ सुधाभाऊ जयराम पेडणेकर यांच्या सेवापुर्तीनिमित्त आयोजित केलेल्या सेवापुर्ती सन्मान सोहळा व ग्रामसेवक स्नेहमेळाव्याचे अौचित्य साधून विजय हटकर लिखित जनसेवक सुधाभाऊ या पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन करण्यात आले.

   


 

    यावेळी व्यासपीठावर ,उत्सवमूर्ती जनसेवक  सुधाकर पेडणेकर ,संघाध्यक्ष सुभाष लाड, उल्काताई विश्वासराव ,गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे ,उपाध्यक्ष नाथा पाटील,रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था संचालक अर्जून नागरगोजे, संजय दळवी, डाॅ.मंगेश हांदे ,शिवाजी पेडणेकर, कोकणी माणूसचे  संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर, माजी राज्यसचिव विजय खवळे ,संदिप हांदे, संजय लोखंडे, गणपत शिर्के ,महेंद्र साळवी, चेतन दाभोळकर, अरुण आपटे ,लेखक विजय हटकर , कीरण बेर्डे , प्रकाश हर्चेकर  आदि मान्यवर उपस्थित होते.

         

      लांजा तालुक्यातील रिंगणे गावचे सुपुत्र व तळवडे ता.राजापुरचे ग्रामविकास अधिकारी श्री सुधाकर पेडणेकर यांच्या जीवनाचा आलेख मांडणारे हे पुस्तकाचे महाराष्ट्भर वितरण करुन  ग्रामसेवक ग्रामोद्धाराचे कार्य कशा पद्धतीने करित असतात हे लोकांपर्यंत पोहचवुन ग्रामसेवकांना प्रतिष्ठा मिळवून देण्याकामी लेखक विजय हटकर व प्रकाशक सुभाष लाड यांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांनी करित जनसेवक सुधाभाऊंच्या ३१ वर्षाच्या निरपेक्ष वाटचालीचा गौरव करित नव्या पिढितील ग्रामसेवकांनी सुधाभाऊंंनी दाखविलेल्या पायवाटेवर चालत विकासाचा महामार्ग करावा असे आवाहन केले.लांजा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले विजय हटकर हे शैक्षणिक क्षेत्रासोबतच पर्यटन, इतिहास, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असून 'मोडीदर्पण' या दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक अाहेत. नाटककार ला.कृ.आयरे ,गुरुवर्य या दोन यशस्वी  पुस्तकानंतर विजय हटकर यांचे 'जनसेवक सुधाभाऊ ' हे तिसरे पुस्तक काल दिमाखदार सोहळ्यात प्रकाशित झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ग्रामसेवक स्नेहमेळाव्यात माजी सेवानिवृत्त ग्रामसेवक बंधू -भगिनी व ग्रामसेवकांंच्या कर्तृत्ववान मुलांचा सत्कार करण्यात आला.

 कार्यक्रमाचे निवेदन लेखक विजय हटकर यांनी तर आभार संजय लोखंडे यांनी मानले.

 


    



https://prahaarkonkan.com/?p=155756