Sunday, February 17, 2019

आता प्रतीक्षा प्रतिहल्ल्याची...
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


     तीन दिवसापूर्वी गुरूवारी दि.१४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:०० च्या दरम्यान जम्मू -काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात तब्बल ३०० किलो  स्फोटकांनी भरलेल्या युएसव्हि (चारचाकि) वाहनाद्वारे जैश -ए-महम्मदचा अतिरेकी आदिल दार याने सुट्टी संपवून काश्मीर खो-यात सेवेत रूजू होणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या वाहन  ताफ्यातील एका बसला धडक दिली व प्रचंड स्फोट झाला. भारतीय जवानांच्या (केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या)वाहन ताफ्यावर चढविलेल्या या भ्याड आत्मघातकी स्वरूपाच्या हल्ल्यात ४० जवान शहिद झाले असून या हल्ल्याच्या जखमा इतक्या खोल व गहि-या अाहेत की,त्या पुढची अनेक वर्षे भरुन निघणार निघणे शक्यच नाहि.भारतद्वेषाच्या भावनेतून सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालणा-या पाकिस्तानला धडा शिकविण्याची हिच योग्य वेळ असून पाकिस्तानचा योग्य तो बदला भारताने घेतला पाहिजे ही संतापाची, क्रोधाची भावना सर्व भारतीय नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.याच वेळी देशासाठी सर्वोच्च कोटीचा त्याग करून हॊतात्म्य पत्करणा-या ४० वीरजवानांच्या दु:खात सर्व राष्ट्रभक्त भारतीय सहभागी झाले असून दु:खाच्या संकटाच्या वेळी भारतीय नागरिकांनी घडविलेल्या अखंडतेचे, एकात्मतेचे दर्शनही अद्भुतच आहे,असेच म्हणावे लागेल.या एकतेतून अशा भ्याड हल्ल्याला  भारतीय कधीच घाबरणार नाहीत उलट ते भारतीय म्हणून आणखी घट्ट बंधनात बांधले जाऊन हातात हात घालून देशाच्या सार्वभौमत्वावर येणारे प्रत्येक संकट उडवून लावतात हा संदेश विरोधकांत पोहचल्याने त्यांची आणखीनच आग झाली असेल.

       दहशतवादी व त्यांना थारा देणाऱ्या पाकविरोधी प्रबळ संतापाची,बदल्याची भारतीयांची भावना लक्षात घेऊन देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या प्रत्येक शहिद जवानाच्या रक्ताच्या थेंबा -थेंबाचा हिशोब चुकता करु व यासाठी भारतीय लष्काराला सर्वाधिकार दिले असून पाकिस्तानला धडा शिकविल्याशिवाय शांत राहणार नसल्याचे सूचक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदिंनी केल्याने देशातील नागरिकांना आता प्रतीक्षा लागली आहे ती पाकिस्तानवर केल्या जाणाऱ्या प्रतिहल्ल्याची...जोपर्यंत भारत सरकार पाकिस्तानवर योग्य तो प्रतिहल्ला चढवीत नाहि तोपर्यंत नागरिकांच्या मनात खदखदत असलेला संताप, द्वेष व राष्ट्रीयत्वाची भावना जिवंत ठेऊन सरकारला राष्ट्रभान दाखविण्याची मोठी जबाबदारी आज प्रत्येकाची आहे हेही समजून घ्यायला हवे.
         एकविसाव्या शतकातील सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला ठरलेल्या पुलवामा हल्ल्यात ४० भारतीय जवान शहिद झाल्याची बातमी ऎकल्यापासून सारा देश हळहळला आहे.सर्व जगाला पोखरणाऱ्या दहशतवादाच्या सर्वाधिक झळा भारताला पोहचत आहेत.आणि म्हणुनच दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी जगातील सर्व शक्तिंनी एकत्रित येऊन भारतासह काम करण्याची गरज आहे.तसेच पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र व जैश- ए- मोहम्मदचा  म्होरक्या मॊलाना मसुदा अझरला आंतरराष्ट्रिय दहशतवादी म्हणून घोषित करावे यासाठी भारताने देखिल मुत्सद्देगिरिचा वापर करुन आंतरराष्ट्रिय राजकरणात एकटे पाडले पाहिजे.या दृष्टीने भारत सरकारने योग्य ती राजनैतिक पाऊले वेळेतच  उचलली आहेत.आंतरराष्ट्रिय व्यापारात पाकला दिलेला सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र अर्थात  ' मोस्ट फेवर्ड ' हा दर्जा काढून घेतला आहे.तसेच पाकिस्तान कडून केल्या जाणाऱ्या आयातीवर २०० टक्के सीमाशुल्क लावून आधीच डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का दिला आहे.पण यावरच थांबून चालणार नाहि .कारण पठाणकोट व उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनेहि तो सुधारल्याचे  दिसून आलेले नाहि.कारण कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच. पाकिस्तानचेहि तसेच आहे.तेव्हा दहशतवादी संघटनांना पोसणा-या पाकड्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची हिच योग्य वेळ आहे.कारण चीन सोडून जगातील सर्वच सामर्थ्यवान राष्ट्रांनी भारताच्या बाजूने उभे राहण्याची तयारी दाखविली आहे.

           काश्मीर खो-यात उरिनंतरचा आजपर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला ठरला असून CRPF च्या ४० जवानांना आलेल्या वीरमरणाने सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या कमतरता व हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला असून अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभे ठाकले आहेत.
१) जम्मू - काश्मीर महामार्ग ही काश्मीर खो-याला उर्वरित भारताशी जोडणाऱि एकमेव जीवनरेखा आहे.त्यावर लष्करी आणि मुलकी वाहनांची अखंड वाहतूक चालू असते.लष्करी गाड्यांचा ताफा जाण्याआधी व दरम्यान घेण्याच्या खबरदारिबाबत एक परिपूर्ण कार्यपद्धती घालून देण्यात आली आहे.त्याचे दक्षतापूर्वक पालन का झाले नाहि हा न उलगडलेला सवाल आहे.जर त्याचे काटेकोर पालन झाले असते तर कदाचित हा धोका टाळता आला असता.
 २) २५०० च्या वर सैनिकांना घेऊन जाणाऱ्या ७८ गाड्यांच्या ताफ्यातील एका वाहनावर एवढी अभेद्य सुरक्षा व्यवस्था असताना आत्मघातकी हल्ला होतोच कसा?
३) ३०० किलो स्फोटकांनी भरलेली कार सुरक्षा रक्षकांच्या दृष्टिस कशी काय पडली नाहि ?
४) भारतमातेसाठि बलिदान देणाऱ्या वीरपूत्रांची हि बलिदानाची श्रृंखला थांबणार तरि कधी?
५) राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर भारत इस्त्रायल,अमेरिका, व शक्तशाली LTTE चा खात्मा करणाऱ्या छोट्याश्या श्रीलंकेप्रमाणे विनाकारण डिवचणा-या या विषारी सापाला (पाकला) कायमचं कधी ठेचणार?
६)प्रखर राष्ट्रवाद व देशहिताला आपण कधी प्राधान्य देणार? ७)लोकशाही देश आहे म्हणून हवे तसे  देशविरोधीमुक्ताफळं उधळणा-या अंतर्गत राष्ट्रदोह्यांचा बंदोबस्त कधी करणार?
का त्यांना मानवतावादाच्या नावाखाली मोकळेच सोडणार?
८)लष्कराप्रमाणे सशस्त्र पोलीस दलांची स्वतंत्र  हेरगिरीची यंत्रणा आपण उभारणार का?
९)लष्करी वाहतुकीसाठी ,आपण आधूनिक पर्यायांचा वापर करणार तरि कधी?
१०) काश्मीर खो-यातील कोवळ्या तरूणांना आपले आयुष्य मरणाच्या दारात फेकावे असे का वाटते?
११) या तरुणांच्या मनातील असंतोष बाजूला करुन त्यांचे मनपरिवर्तन करुन त्यांच्या हाताला काम उपलब्ध करुन त्यांना प्रगतीच्या वाटेवर कधी आणणार?
     असे एक ना अनेक प्रश्न मनी थैमान घालताहेत.काश्मीरला दिलेल्या विशेष राज्याच्या दर्ज्यामुळेच आज काश्मीरातील अनेकांच्या मनात भारतीयत्वाची भावना नाहिए,हे वास्तव आपण स्विकारून हा दर्जा रद्द करण्यासारखे धाडसी पाऊल उचलण्याची आवश्यकता आज निर्माण झाली आहे.गेली कित्येक वर्षे काश्मीर खो-यात कारवाया करण्यासाठी  पाकिस्तानकडून पर्याय म्हणून जैश-ए-मोहम्मद सारख्या अतिरेकी संघटनांचा वापर करण्यात येतो.या दहशतवाद्यांना पाकिस्तान आश्रय देतो हे आता जगासमोर सिद्ध झाले आहे.काश्मीरमध्ये फुटिरतावाद्यांनाहि भारतविरोधी गरळ ओकण्यासाठी परकिय आर्थिक रसद मिळते.याच्या जोरावर भारतात राहून इथले मीठ खाऊन याच भूमीचे ईमान विकणाऱ्या या पाकप्रणीत फुटिरतावादि दलालांचाहि बंदोबस्त करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे.या देशात राहून देशविरोधी कृत्य करणारे वा त्यात सामील होणारे, देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना आश्रय देणाऱ्यांवर जोपर्यंत योग्य ती कारवाई होऊन या राष्ट्रदोह्यांचा खात्मा जोपर्यंत होत  नाहि तोपर्यंत असे भ्याड हल्ले होतच राहणार आहेत.आणि म्हणूनच आता वेळ आली आहे ती प्रतिहल्ल्याची..
     हा प्रतिहल्ला भारतविरोध करणाऱ्या  अंतर्गत व बाह्य दोन्ही शत्रुंवर योग्य वेळ येताच मुत्सद्दीगिरिने ,सावधानतेने चढविला तरच कुठेतरी या दहशतवादाला आळा बसेल.यासाठी योग्य ते नियोजनात्मक. धडक कारवाई करुन पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या तरच पुलवामातील ४० शहिद जवानांसह आजपर्यंत शहिद झालेल्या सर्वच वीरपुत्रांना ख-या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.
मुंबई व ठाणे उपनगरातील प्रसिद्ध वर्तमानपत्र दै.महासागर ने मी लिहिलेला " आता प्रतीक्षा प्रतीहल्ल्याची " 

या  लेखाला शुक्रवार दिनांक २२ फेब्रुवारिच्या अंकात संपादकीय पानावर प्रसिद्ध केले.


    धन्यवाद 
दै.महासागर.
🙏🏻🙏🏻🙏🏻
💐💐💐💐💐💐💐

     श्री विजय हटकर
      लांजा.

Wednesday, February 13, 2019

"राष्ट्रसेवा " गुणाने एकरूप झालेला समाजच समृद्ध भारत निर्माण करेल.
                 :-विजय हटकर.
         
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳अार.एस.एस.शाखा लांजाच्या दिवाळि वर्गात "कुलूपबंद राष्ट्रभक्ति "या विषयावर विजय हटकर यांचे व्याख्यान संपन्न.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳




लांजा:-
        राष्ट्रभक्ती आॅप्शनला टाकता येत नाही ती आपल्या श्वासासहीत हिमोग्लोबिन सारखी भिनायला हवी.ती नेहमी आपल्या वागण्या ,बोलण्यात व आचरणात दिसली पाहिजे असे मत "कुलूपबंद राष्ट्रभक्ती" या विषयावर व्याख्यान देताना विजय हटकर यांनी व्यक्त केले.
        लांजा तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने 'कोकणगाभा कृषी पर्यटन केंद्र -गवाणे,ता.लांजा येथे दिवाळी संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय शिबीराच्या दुस-या दिवशी दुपार सत्रात विजय हटकर बोलत होते. यावेळी स्वयंसेवकाना मार्गदर्शन करताना हटकर म्हणाले की, गुणांची एकरूपता म्हणजे च राष्ट्रभक्ती असून सर्व समाज राष्ट्राची सेवा करणे या गुणाने एकरूप झाला तरच देश समृद्ध बनेल.आजच्या समाजात स्वार्थभाव हा वाढत असुन देशप्रेम लोप पावत चालले आहे आणि म्हणूनच आजच्या  विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील  राष्ट्रभक्ती नेहमी प्रज्वलित ठेवले पाहिजे.घरातील महिलामंडळी ज्याप्रमाणे एखाद्या कार्यक्रमावेळी घरच्या अलमारित कुलूपबंद केलेले सोन्याचे मूल्यवान दागिने बाहेर काढतात व कार्यक्रम संपन्न झाल्यावर पुन्हा कपाटात कुलूपबंद करतात.राष्ट्रभक्तीच्या बाबतीतही तसच काहीतरी आपलं झालय. शाळेत राष्ट्रगीत म्हणताना,१५ आॅगस्ट ,२६ जानेवारिला झेंडावंदन करताना,भारत -पाकिस्तानच्या मॅचवेळि, सर्जिकल स्ट्राईक वा युद्धाप्रसंगी आपल्या ह्रदयात बंद केलेली राष्ट्रभक्ती बाहेर पडते.व काहि वेळेनंतर ती शांत होते.परंतु सद्यस्थितीत चीन, पाकिस्तानसारखे शत्रू आपल्याविरोधात सतत गरळ ओकताना,कटकारस्थान रचत असताना आपली राष्ट्रभक्ती सतत तेवत ठेऊन समृध्द भारताच्या निर्मिती साठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे मत विजय हटकर यांनी व्यक्त केले.
        लांजा तालुक्यातील कोकणगाभा कृषी पर्यटन केंद्र गवाणे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा लांज्याचा दिवाळी संस्कार निवासी वर्ग दि. १६ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०१८ उत्साहात सुरू आहे.या वर्गात सुमारे २१ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे.या वर्गांतर्गत स्वयंसेवकांचा बॊद्धिक,शारिरिक ,नैतिक, सांस्कृतिक, विकास साधण्यावर भर दिला जात असून या वर्गाचे व्यवस्थापन तालुका कार्यवाह सूर्यकांत सरदेसाई पाहत आहेत. या वर्गामध्ये दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सुप्रसिद्ध विधीज्ञ अभिजित अभ्यंकर यांचे वाचन प्रेरणा , सुप्रसिद्ध रंगकर्मी श्रीकांत ढालकर यांचे कला व पक्षीनिरीक्षण ,दिनांक १७ नोव्हेंबर रोजी श्रीधर पाटील यांचे सैनिकी शिक्षण याविषयी व्याख्यान संपन्न झाले. व्याख्यानाला विधीज्ञ राजेश गुरव, सुरेंद्र लाड, गॊरव शेट्ये,स्वयंसेवक वेद दामले ,प्रमूख शिक्षक निखिल आपटे, अथर्व हर्डीकर व रा.स्व.संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पै.एम. के.रखांगी स्मृतीगंध वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.
☘☘☘☘☘☘☘
पै.एम. के.रखांगींचे कार्य आदर्शवत - मुख्या. गणपत शिर्के.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
माजी विद्यार्थी संघटनेचे कार्य कॊतुकास्पद.-प्राचार्य डाॅ.अरविंद कुलकर्णी.







लांजा:-
       पै.मेहमुद कादिर उर्फ एम.के.रखांगी यांच्या विचारांचा स्मृतीगंध पुढील पिढीत दरवळण्यासाठी माजी विद्यार्थी संघटना आयोजित "स्मृतीगंध वक्तृत्व स्पर्धा "मोलाची भूमिका बजावेल असे मत कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय ,लांजाचे प्राचार्य डाॅ.अरविंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
       न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजाचे माजी सचिव पै. एम.के.रखांगी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त माजी विद्यार्थी संघटना, लांजा ने स्मृतीगंध वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन लांजा हायस्कूलच्या विद्यार्थी सभागृहात  केले होते. याच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष जयवंत शेट्ये,श्रीराम वंजारे, विजय खवळे ,संजय तेंडुलकर, पत्रकार दिलीप मुजावर, पत्रकार सिराज नेवरेकर,मुख्या.गणपत शिर्के, विजय बेर्डे, उद्योजक अभिमन्यू पायरे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष परुषोत्तम साळवी, पत्रकार जगदीश कदम,राजेश शेट्ये, उपमुख्याध्यापक रमाकांत सावंत, संजय बुटाला,तसेच माजी विद्यार्थी  अभिजित राजेशिर्के, विनय बुटाला, विनोद बेनकर, प्रदीप नागराळे, निलेश चव्हाण,किर्ती कांबळे,आनंद भागवत, रामचंद्र भातडे, विवेक पंडित, अमोल मेस्त्री आदि उपस्थित होते.
         पै.एम.के.रखांगी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.संस्थेचे माजी सचिव व लांजा तालुका पत्रकार संघाची मुहूर्तमेढ रोवणारे पै.एम.के
रखांगी यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेत आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटाविला.व  योग्य समयी निवृत्त होऊन न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाच्या विकासासाठी पुढाकार घेतला.व कार्यवाही म्हणून आदर्शव्रत कार्य केल्याचे गॊरवोद्गार यासमयी मुख्या. गणपत शिर्के यांनी काढले. तर कोकण मर्कंटाईल बँकेचे संचालक दिलीप मुजावर यांनी एम.के.रखांगी तालुक्यातील अभ्यासू पत्रकार होते.त्यांनी पत्रकारितेच्या अवघड काळात रत्नागिरी टाईम्स व दै.सागर मधून उल्लेखनीय काम केल्याचे मत व्यक्त केले.
तसेच महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज नेवरेकर यांनी एम.कें .च्यापवित्र स्मृतीस अभिवादन करित माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
     माजी विद्यार्थी संघटनेतर्फे पै.एम.के.रखांगी स्मृतीगंध वक्तृत्व स्पर्धेचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर आयोजन करण्यात आले होते.यासाठी  उद्याचा भारत,माझ्या स्वप्नातील भारत, आजचा युवक,तरुणाई ,आदि विषय देण्यात आले होते.या स्पर्धेत जवळपास ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना याप्रसंगी       मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, देऊन गॊरविण्यात आले.
 स्पर्धेचा निकाल--
प्राथमिक गट.
सानिया मासाळ- प्रथम
ओम दळवी - द्वितीय
सेजल वाघाटे- द्तृतीय
अपूर्वा देसाई- उत्तेजनार्थ
श्रावणी यादव- उत्तेजनार्थ

माध्यमिक स्तर--
,श्रेया पाटील-प्रथम
अभिलाषा गावडे- द्वितीय
प्रज्ञा पालकर- तृतीय
अंकिता जाधव- उत्तेजनार्थ
सिद्धी चव्हाण-उत्तेजनार्थ

उच्च माध्यमिक स्तर

जुहिका शेट्ये- प्रथम
आर्यन कासारे - द्वितीय
आश्विनी जोईल- तृतीउ
साक्षी चव्हाण-उत्तेजनार्थ
आशिष मांडवकर -उत्तेजनार्थ.
      या कार्यक्रमाचे निवेदन विजय हटकर यांनी तर आभार प्रदीप नागराळे यांनी मानले.
सुप्रसिद्ध नाटककार दशरथ राणे यांनी लोकमान्य वाचनालय लांज्याला दिला आपल्या प्रसिद्ध नाटकांचा संच भेट.
@@@@@@@@@@
पन्नास हजार ग्रंथसंपदा पूर्ती उपक्रमात घेतला सहभाग.
 
अरविंद रुणकर यांनी स्वलिखित पुस्तकांचा संच दिला भेट.

लांजा :-
        येथील लोकमान्य वाचनालय, लांजे या संस्थेने सन २०१८ अखेर पन्नास हजार ग्रंथसंपदा पूर्ती  संकल्प जाहिर केला अाहे. या संकल्पात सहभाग घेऊन अनेक मान्यवर लोकमान्य वाचनालय ,लांजा या संस्थेला पुस्तके भेट देत असतानाच आज दिनांक १९ आॅक्टो.२०१८ रोजी लांजा - बोरथडे गावचे सुपुत्र व जेष्ट नाटककार श्री दशरथ राणे व लांजा -रुण गावचे सुपुत्र श्री अरविंद रुणकर यांनी आपल्या स्वलिखित नाटक व एकांकीकांच्या ३५ पुस्तकांचा संच लोकमान्य वाचनालय लांजाचे संचालक विजय हटकर ,ग्रंथपाल सी.स्मिता उपशेट्ये, सहा.ग्रंथपाल रामचंद्र लांजेकर यांना भेट दिला.
          श्री दशरथ राणे यांच्यावतीने  नाटककार, दिग्दर्शक श्री अरविंद रुणकर यांनी पुस्तकांचा संच भेट देत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक विजय हटकर यांनी त्यांचे आभार मानले.
            सुप्रसिद्ध नाटककार श्री दशरथ राणे यांना अखिल मराठी नाट्यपरिषदेने १९९९ साली नाटककार मा.आ.कामत स्मृती पुरस्कार आणि सन २०१७ साली मराठी नाटककार. संघ पुरस्कृत. प्र.म.तथा बापूसाहेब टिळक स्मृती  पुरस्कार देऊन गॊरविले  आहे.तसेच अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरिल  संस्थांनी पुरस्कार देऊन गॊरविले आहे.नाट्यलेखनाची अनेक पारितोषिके मिळविलेले नाटककार. श्री दशरथ राणे यांची यंदा कर्तव्य आहे,जावई चालून आला,लग्न शांतूच्या मव्हणीचं,देवाघरचा न्याय, सॊभाग्यलक्ष्मी, अग्निपरिक्षा, कहाणी रक्ताच्या  नात्याची, गुन्हेगार, गाव इनामी, अन्यायाचा कर्दनकाळ, वणवा सुडाग्नीचा,लॊकिक घराण्याचा,शिवशाहिचा विजयी  डंका, जपून टाक पाऊल जरा,इथे थांबली जीवनगंगा, पतिव्रता, सॊभाग्यदाता, देवमाणसं, दोस्ती वै-याची, सत्य उभे अंधारि, बायको असून देखणी, मधुचंद्राने  केला  घोटाळा,आदि नाटकांना नाट्यरसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.ग्रामीण रंगभूमी समृद्ध करणा-या श्री दशरथ राणे यांना लोकमान्य वाचनालयाच्या वतीने मनपूर्वक. धन्यवाद।
        यासाठी सहकार्य करणारे आमचे मार्गदर्शक श्री अमोल रेडिज यांचेही मनपूर्वक आभार।श्री अरविंद  रुणकर यांचेही आभार।
 "दीपपूजन व विधीचा वाढदिवस
💐💐💐💐💐💐💐💐
   







   'भा' म्हणजे तेज.'रत' म्हणजे मग्न.भारतीय म्हणजे तेजाच्या उपासनेत,म्हणजे साधना करण्यात जे मग्न आहेत ते.  उपासनेला भारतीय संस्कृतीत फार महत्वाचे स्थान दिले आहे.या तेजोमयी संस्कृतीचे प्रतीक म्हणजे 'दीप.' आजचा दिवस या दृष्टिने भारतीय संस्कृतीत खुप महत्वाचा अाहे,कारण आज आहे दीप अमावस्या.आषाढ महिन्यातील अमावास्येलाच 'दिव्यांची अमावस्या' म्हटले जाते. रात्रीच्या अंधाराला चीरवून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप भारतीयांच्या घरा-घरात मांगल्याचे प्रतीक म्हणून पूजला जातो.या दिवशी घरात जे दिवे वर्षभर प्रकाश देत रहातात त्यांची मोठ्या भक्तिभावाने व समारंभाने पूजा केली जाते.सोबत घरातील लहान मुलांचीही प्रेमपूर्वक ओवाळणी करून " आयुष्यमान हो" हा आशीर्वाद देण्याचा हा शुभदिवस.
             आमच्या दृष्टीने दीप अमावस्येचा हा दिवस खुप आनंदाचा दिवस.कारण तीन वर्षापूर्वी दिनांक १४ आॅगस्ट २०१५ रोजी दीप अमावस्येलाच दुपारी ४:०० वाजता आम्हा उभयतांना कन्यारत्नाचा लाभ झाला .गेली बारा वर्षे दिवाळीत आश्विनी अमावस्येला आम्ही फ्रेन्डस् ग्रुपच्या माध्यमातून गेली बारा वर्षे सातत्यपूर्वक लक्ष्मीपूजन अर्थात दीपलक्ष्मीच्या पुजनाच्या मुहूर्तावर लांजा शहरात कोकणातील सर्वात मोठा दीपोत्सव अकरा हजार पणत्या प्रकाशित करुन साजरा करीत आहोत. व याचेच फळ की काय म्हणून विधात्याच्या आशीर्वादाने दीपामावस्येच्या शुभदिनीच आमच्या घरि कु."विधीच्या" रूपाने दिपिकेचाच जन्म  झाला. म्हणुनच गेली तीन वर्षे दीपामावस्येला आम्ही जाणीवपूर्वक दीपलक्ष्मीचे पूजन करित आहे.आज कुमारी विधीचाहि तिथीप्रमाणे जन्मदिवस.तिचेही आम्हि सर्वांनी प्रेमाने ऒक्षण केले. व तिला खुप खुप मोठी हो हा आशीर्वाद सर्वांनी दिला.छोट्या विधीनेही आमच्या सोबत
        " भोदीपं ब्रम्हरुपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यय: ।।
          "त्राही मां निर्यात घोरात् दीपज्योती नमोस्तुते।।
--हा श्लोक म्हणत दिपपूजन केले.

     वैदिक काळात ऋषीमहर्षींच्या आश्रमातील यज्ञवेदी व अग्निकुंडे हि धार्मिकांची यात्रास्थाने झालेली होती. यज्ञवेदी हा तत्कालीन समाजाचा मानबिंदू होता. ते त्यांचे श्रद्धास्थान होते.यज्ञवेदीतील अग्निदेवतेला साक्षी ठेवून ऋषी-महर्षींच्या आध्यात्मिक चर्चा- परिसंवाद घडत. वेद,ब्राम्हण्ये,उपनिषदे आणि संहिता जन्मास आल्या त्या अशा.भारताच्या महान सांस्कृतिक परंपरेचा उगम अशा रितीने यज्ञवेदीतील अग्निशलाकेतून झाला.कालांतराने या पवित्र आणि मंगल शलाकेने दीपाचे रूप धारण केले.
 अग्निज्योतिर्रविज्योंतिश्चन्द्र: ज्योतिस्तथैवच।
उत्तमस्सर्व ज्योतिबांनी दीपोsयम्।।
                                    स्कंदपुराण.
या दीपयुगाला सुरवात झाली ती अशी.- " सुर्याशसंभवो दीप:
दीपयुगाच्या सुरवातीपासूनच आजतागायत दीपाला जीवनातील मांगल्याचे, भक्तिचे ,अर्चनाचे आणि आशीर्वादाचे शुभलक्षण मानले गेले आहे.
           दीपपूजनाच्या या पवित्र दिवशी, कु.विधीच्या जन्मदिनी दरवर्षी एक नवा दीप आमच्या संग्रही करण्याचा आम्हि संकल्प केला आहे .गतवर्षी आम्ही वैशिट्यपूर्ण ॐकारदीप खरेदि केला तर यंदा भोवताली डायमंड असलेला बैठा आकर्षक दीप आमच्या दीपसंग्रहात सामील झाला. यंदा या सर्व दीपांची पूजा करताना हा डायमंड ने वेढलेला बैठा दीप प्रकाशित झाल्यावर आणखी आकर्षक दिसू लागला. तो सर्वांचे लक्ष वेधुन घेत होता.
      पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करणा-या आपल्या समाजाने इतर सणांप्रमाणेच या उत्सवाचेही विकृतीकरण करित त्याला 'गटारी अमावस्या 'हे नाव बहाल केले.हे खेदजनक आहे. एकूणच तमसोsमा ज्योतीर्गमय ची आर्त याचना करणाऱ्या  मानवाला नेणिवेतून जाणीवेकडे ,अंधारतून प्रकाशाकडे व नश्वरतेतून अमृतत्वाकडे नेणाऱ्या दीपलक्ष्मीकडे एकच प्रार्थना,आमच्या लाडकि परि कु.विधीला सुखात, आनंदात ,ऎश्वर्यात ठेव।
-----------------------------------------
               विजय हटकर.
                  लांजा, रत्नागिरी.

साप्ताहिक कोकण मिडिया तील लेख..सन २८ जुलै २०२२
https://kokanmedia.in/2022/07/28/deepamavasyapoojan/



दीपपूजन २०२३ क्षणचित्रे 





Tuesday, February 12, 2019

🖌रंगांचा किमयागार महेश करंबेळे🖌.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
नाटककार ला.कृ.आयरे कलाश्री पुरस्काराने श्री महेश करंबेळे सन्मानित. 
💐💐💐💐💐💐💐💐
          सुप्रसिद्ध चित्रकार महेश करंबेळे लांजा तालुक्यातील ऎतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोट गावचे सुपुत्र. आजच्या घडीला भारतातील ख्यातनाम चित्रकारांमधील एक असलेल्या श्री करंबेळे यांची चित्रे दुबई व मिलान (इटली)येथील आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात झळकली आहेत.मुंबई महानगराचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रांतून पहावयास मिळते.भारतातील सुप्रसिद्ध कला संग्रहकांकडे त्यांच्या कुंचल्यातून साकार झालेली चित्रे संग्रहात आहेत.कोकणच्या मातीशी नाळ जुळलेल्या श्री महेश करंबेळे यांनी आपल्या सशक्त चित्रांतून पद्मश्री भावना सोमय्यांसारख्या अनेक दिग्गजांना प्रभावित केले आहे.समीक्षक ,रसिक,कलासंग्रहकांची पसंती मिळविणाऱ्या ,रंगांचा किमयागार असलेल्या श्री महेश मकरंबेळे यांच्या कुंचल्यातील क्षमता वादातीत आहे.

         एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यातून पांढऱ्याशुभ्र कागदावर उमटून आलेलं चैतन्यदायी चित्र मनाला प्रसन्न करतं.रंग, रुप, जमीन,आकाश अगदी एखादी निर्जीव वस्तूही चित्रकार आपल्या चित्राद्वारे जिवंत उभी करतात.ठिपके आणि रेषांच्या सहाय्याने चित्रकार सॊंदर्याचा आविष्कार घडवितात.कागदावर उमटणाऱ्या प्रत्येक छटा अगदी भिन्न असतात.पण एकदा रंगाचा खेळ सुरू झाला की,पांढराशुभ्र कागद जिवंत वाटू लागतो.अशीच काहीशी जादू मुंबईतील सुप्रसिद्ध चित्रकार श्री महेश करंबेळे यांच्या चित्रात पहायला मिळते.मानवी जीवनातील विविध घटनांचे,मुंबई सारख्या महानगराचे प्रतिबिंब आणि वैशिष्ट्ये, मानवी भावनांचे विविध तरंग महेश करंबेळे यांच्या चित्रातून तुम्हाला अनुभवायला मिळतील.
          भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलेले महेश करंबेळे लांजा तालुक्यातील ऎतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोट गावचे सुपुत्र. कोकणच्या या सुपुत्राने आपल्या कुंचल्यातून वयाच्या पस्तीशीतच जागतिक पातळीवरिल ख्यातनाम चित्रकार म्हणून आपल्या कलात्मकतेचा ठसा उमटविला आहे.भारतासह सातासमुद्रापार लंडन,फ्रान्स पोर्तुगाल,यु.के.,यु.एस.ए., आॅस्ट्रेलिया,दक्षिण आफ्रिका,सिंगापूर,जर्मनी, दुबई येथील विविध आंतरराष्ट्रिय चित्रकारांसोबत अनेक विषय चित्रबद्ध करित देशाचे नाव उज्वल केले आहे.
     रुपारेल काॅलेज, मुंबईमध्ये द्वितीय वर्ष कला पूर्ण झाल्यावर त्यांनी प्रणव आर्टस् इन्स्टिट्यूट मुंबईतून फाईन आर्ट चा अभ्यासक्रम सन २००५ मध्ये यशस्वी पूर्ण केला आणि अभिजात कलेची मूल्ये जोपासत वास्तववादी शैलीत प्रभावी रेखाटन,सूक्ष्म निरीक्षण, मुंबई महानगरचा व तेथील दैनंदिन जीवनाचा सखोल अभ्यास, मानवाकृतींचे योग्य आकलन,हावभाव व्यक्त करण्याची कसोटी व विषयानुरूप वातावरण निर्मिती या चित्रवैशिष्ट्यांच्या जोरावर विविध विषय आपल्या कुंचल्यातून प्रभावी हाताळले. महेश करंबेळे अस्सल मुंबईकर. मुंबईकर असल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे.आणि म्हणूनच आजच्या संगणकिय युगातहि मुंबई सारख्या महानगरातील सांस्कृतिक वारसा अबधित ठेवण्यासाठी त्यांनी मुंबईच्या सामाजिक,सांस्कृतिक, वास्तुशिल्प, वाणिज्य तसेच महानगरातील  दैनंदिन जीवनातील विविध घटनांवर  आधारित प्रभावी चित्रकृती त्यांनी रेखाटल्या आहेत. आॅईल,अक्राॅलिक व वाॅटर कलरच्या माध्यमातून त्यांनी रेखाटलेल्या राजाबाई टाॅवर,महात्मा फुले मंडई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, गेटवे आॅफ इंडिया या चित्रांतून या स्थळांचे जणू "प्रतिबिंबच " अनुभवायला मिळते.या जोडीने मुंबईकरांची दैनंदिन जीवनासाठीची संघर्षाची भावना,जिद्द,जगण्याच्या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न आदी मुंबईकरांच्या स्वभावाच्या सूक्ष्म पैलूंना छेडण्याचे धाडस महेश यांनी आपल्या शैलीतून केले आहे.नव्या आणि जुन्या मुंबईचे मिश्रण त्यांनी अतिशय कार्यक्षमतेने केले आहे.त्यामुळे त्यांची चित्रे पाहून मन प्रसन्न होते.
     श्री महेश करंबेळे यांची ललित कला अकादमी दिल्ली,नेहरू सेंटर आर्ट गॅलरी मुंबई, लीला आर्ट गॅलरी मुंबई, कमल नयन बजाज आर्ट गॅलरि मुंबई, चित्रे आर्ट गॅलरी नवी मुंबई, जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई, सायन्स सेंटर आॅफ आर्ट गॅलरी सूरत,आॅल इंडिया फाईन आर्टस् अॅन्ड क्राफ्टस् सोसायटी गॅलरी दिल्ली,ब्रश स्ट्रोक आर्ट गॅलरी पुणे   या भारतातील सुप्रसिद्ध आर्ट गॅलरींसोबतच सिद्धार्थ नेहरू वांगचूक कल्चरल सेंटर थिंफू - भुटान येथेही चित्रप्रदर्शन भरविण्यात आले होते.
             दुबईमध्ये दरवर्षी ' वर्ल्ड आर्ट दुबई' या आंतरराष्ट्रिय चित्रमहोत्सवाचे आयोजन केले जाते.जगभरातील जागतिक दर्जाचे चित्रकार आपली कला येथे सादर करतात.लाखो कलारसिक या महोत्सवाला भेट देतात.या चित्र प्रदर्शनात आपली चित्रे प्रदर्शित करण्यापूर्वी चित्रकाराला ती चित्रे दुबईच्या संयोजन समितीकडे पाठवावी लागतात.दुबईतील कला समीक्षकांच्या पसंतीसाठी उतरलेल्या चित्रांना या महोत्सवात सादरिकरणाची संधी दिली जाते.सन २०१७ व २०१८ मध्ये महेश करंबेळे यांची चित्रे  दुबईच्या समीक्षकांची पसंती मिळवून ' वर्ल्ड आर्ट दुबई' या महोत्सवात झळकली.त्यांच्या चित्रांनी विविध देशातील कलारसिकांना मोहिनी घातली.पोर्तुगाल,आॅस्ट्रेलिया, जर्मनी ,यु.के.,यु.एस.ए.,साऊथ आफ्रिका,सिंगापूर, दुबई इत्यादी देशातील कलारसिकांनी करंबेळेंची चित्रे विकत घेऊन आपला कलासंग्रह समृद्ध केला आहे.आजच्या घडिला भारतातील सुप्रसिद्ध आर्ट कलेक्टर (कला संग्रहक) हर्ष गोएंका, पद्मश्री प्राप्त समीक्षक  भावना सोमय्या,प्रताप नायर ,उद्योजक विजय भिमराजका,मराठी अभिनेता संदीप कुलकर्णी, मुंबई चे माजी महापौर दत्ता दळवी व सुनिल प्रभू अशा अनेक प्रतिष्ठितांच्या घरांच्या भिंती महेश करंबेळे यांच्या कुंचल्यातुन साकार झालेल्या चित्रांनी सुशोभित झाल्या आहेत.वयाच्या पस्तीशीत चित्रकला क्षेत्रात  यशाची शिखरे सर करणाऱ्या व सातासमुद्रापार आपल्या सुंदर चित्रांनी भारताची मान उंचावण्या-या चित्रकार महेश करंबेळे यांना नुकताच कोट,ता. लांजा येथे रंगलेल्या पाचव्या ग्रामीण साहित्य संमेलनात कोकणातील प्रतिष्ठेचा नाटककार ला.कृ.आयरे कलाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रंगांचा किमयागार असलेल्या श्री महेश करंबेळे यांच्या  भावी वाटचालीसाठी हार्दीक शुभचिंतन.
        💐💐💐💐

  -  विजय हटकर.
दै.तरुण भारत संवादमध्ये सदर ब्लाॅग व्यक्ती विशेष सदरात प्रसिद्ध झाला.
दै.पुढारी ने हि घेतली दखल.

दै.महासागर, पालघर ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्राने घेतली दखल.
हॅप्पी बर्थडे विजयजी नारकर.
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
💐💐💐💐💐💐💐💐
   

     कर्तृत्ववान आई-वडिलांच्या संस्काररुपी विचारांचं संचित पुढील पिढीत संक्रमित करण्यासाठि त्या कर्तृत्ववान व्यक्तींची मुलेही तितकीच सामाजिक जाणीवने प्रगल्भ असावी लागतात.तरच तो आदर्श वारसा समाजाच्या दृष्टिने हितकारक ठरतो.बाबा आमटेंचे चिरंजीव प्रकाश व विकास आमटे हि अशीच काहि दुर्मिळ नावे.जी आपल्या बाबांचा सामाजिक कार्याचा वसा पुढे चालवित आहेत.
    लांजा सारख्या छोट्याखानी शहरातही अशाच एका  मुलांच्या जोडगोळी आपल्या कर्तृत्ववान वडिलांच्या विचारांचा वारसा तितक्याच आत्मियतेने अव्याहतपणे पुढे चालवित आहेत,ती जोडगोळी म्हणजेच दिलीप ऊर्फ भाऊ व विजय नारकर. लांजा तालुक्यातील जेष्ठ समाजवादी नेते भाई नारकर तथा गणपत राघोबा नारकर यांच्या या दोन्ही सुपूत्रांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शॆक्षणिक ,सामाजिक, सांस्कृतिक, सहकार,कृषी,या क्षेत्रात असेच उल्लेखनीय कार्य केले आहे.
     आज ०८ डिसेंबर. श्री विजय नारकर यांचा वाढदिवस. आदरणीय भाई नारकर यांनी दूरदर्शीपणाने स्थापन केलेली जनता सहकारी पतसंस्था आज विकासाकडे घॊडदॊड करित आहे.आज या  संस्थेने श्री विजय नारकर यांच्या अध्यक्षतेखाली यशाची, विश्वासाची २५ वर्षे पूर्ण करून सभासदांशी बांधिलकी जोपासली आहे. विजय नारकर सद्यस्थितीत लोकमान्य वाचनालय लांजा  या वाचन संस्कृती जोपासणा-या वर्धिष्णू संस्थेचेही अध्यक्षपद समर्थपणे संभाळत आहेत.त्यांच्याच कालावधीत आज वाचनालयाची अर्ध्या गुंठेत सुंदर इमारत उभी राहिली आहे जी शहरातील नागरिकांच्या मनाची व बुद्धीची मशागत करत आहे. नारकर लांजा तालुका खरेदी-विक्री संघ व माजी विद्यार्थी संघाचेतही कार्यरत आहेत.विविध संस्थामध्ये  त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.त्यांच्या कार्यपद्धती मुळे त्यांचे सहकारिही सदैव त्यांची सोबत करतात.
 आज त्यांचा वाढदिवस.
आगामी काळात आपल्याला आरोग्यदायी जीवन व शतायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

💐💐💐💐💐💐💐
        आपला
     विजय हटकर
        लांजा.