Sunday, June 26, 2022

महाराष्ट्र साहित्य परिषद लांजा शाखेचे उद् घाटन उत्साहात संपन्न.

 महाराष्ट्र साहित्य परिषद लांजा शाखेचे उद् घाटन उत्साहात संपन्न.


 समाजाने साहित्यभिमुख होण्याची गरज.                                                   - प्राध्या.मिलिंद जोशी


 लांजा  :-- 



 वाचनसंस्कृतीपासून दुर चाललेल्या लोकांपर्यंत साहित्य पोहचविण्यासाठी समाजानेच आता साहित्यभिमुख होण्याची गरज असून समाजात सगळीकडे पसरलेला झाकोळ मसाप च्या माध्यमातून दूर करुन प्रकाशवाटा दाखवायचे काम आपल्याला करावयाचे आहे  ,असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद ,पुणेचे कार्याध्यक्ष प्राध्या.मिलींद जोशी यांनी लांजा येथे केले.

 


           

       लांज्यातील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवार दि.२५ जुन रोजी सायंकाळी ५:३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेच्या लांजा शाखेचे उद् घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी ते बोलत होते.यावेळी मसाप पुणेच्या कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार, ज्येष्ठ साहित्यिक व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे जिल्हाध्यक्ष डाॅ.तानाजीराव चोरगे ,लोटिस्मा चिपळुणचे माजी अध्यक्ष प्रकाशजी देशपांडे, सुप्रसिद्ध कवी अरुण इंगवले, मसाप शाखा चिपळुणचे अध्यक्ष प्राध्या.संतोष गोनबरे ,लांजा शाखेचे अध्यक्ष विधिज्ञ विलास कुवळेकर आदी  मान्यवर उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेची ओळख  महाराष्ट्रभर व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती देताना समीक्षा संमेलन, विभागीय संमेलन, युवा संमेलन, शिवार संमेलन आदी वैशिष्ट्यपुर्ण संमेलने आयोजित केली जात असून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षाची सन्मानाने निवड होण्यामागे मसाप ची आग्रही भूमिका महत्वपूर्ण ठरल्याचे मत व्यक्त करित लांजा शाखेने लांजा परिसरातील महाविद्यालये, वाचनसंस्कृती निगडीत संस्थांशी अभिसरण करुन मसापच्या माध्यमातून साहित्यिक चळवळ उभारावी असे आवाहन प्राध्या.मिलिंद जोशी यांनी केले.

       


      यावेळी ज्येष्ठ साहित्यीक डाॅ.तानाजीराव चोरगे यांनी  आजच्या पिढीची मराठी भाषाविषयक असलेली अनास्था व्यक्त करताना टी.वी.वरील मराठी मालिकांमधून होत असलेला चुकीचा भाषाप्रचार त्याला कारणीभुत असल्याचे सांगत मसापच्या माध्यमातून  योग्य भाषेचा आग्रहासाठी आपल्याला ठोस पाऊले उचलावी लागतील असे सांगत शिक्षक व पालक वाचतांना दिसले तरच त्यांचे अनुकरण करणारी नवी पिढी वाचनसंस्कृतीकडे वळणार असल्याचे मत व्यक्त केले. यासाठीच स्थानिक प्रतिभेच्या कवडश्यांना योग्य संधी देण्याचे काम करणा-या महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेचा लाभ लांजावासीयांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी लांजा शाखेचे अध्यक्ष - विलास कुवळेकर, उपाध्यक्ष - विजयालक्ष्मी देवगोजी, सचिव -  विजय हटकर, निरंजन देशमुख, डाॅ.राजेश माळी या नव्या कार्यकारीणीला  मान्यवरांच्या शुभहस्ते गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.



    कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत मुंबई ,ठाणे ,पुणे ही साहित्याची प्रकाशबेटे असून यापासून कोसो दूर असलेल्या मात्र साहित्यिकांची समृद्ध परंपरा असलेल्या लांजा तालुक्यात साहित्यदीपाचा छोटा दीप प्रज्वलित व्हावा यासाठीच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेची स्थापना करित असल्याचे सांगत लांज्याच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचा परिचय ॲड.विलास कुवळेकर यांनी उपस्थितांना करुन दिला. यासोबतच मसापच्या कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार आणि कवी अरुण इंगवले यांनी लांजा शाखेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे निवेदन डाॅ.राहूल मराठे यांनी तर आभार विजय हटकर यांनी मानले. कार्यक्रमाला साप्ताहिक आंदोलन चे संपादक गजाभाऊ वाघदरे , जयवंतराव विचारे, डाॅ.महेश बावधनकर,  प्राध्या.धनंजय क्षीरसागर,डाॅ.राजेंद्र शेवडे , डाॅ.जालिंदर लोणके , प्राध्या.ऋषिकेश पाटील , नितीन कदम , प्रकाश हर्चेकर, झोरे ,उमेश केसरकर, डाॅ.माया तिरमारे, राकेश दळवी ,पराग शिंदे ,गुरुप्रसाद सनगर ,आदि साहित्यावर प्रेम करणारी मंडळी उपस्थित होती.

--------------------

मसाप लांजा शाखा उदघाटनसोहळ्याची क्षणचित्रे

दिपप्रज्वलन करताना प्रकाशजी देेेशपांडे

मसाप कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार यांचे स्वागत करताना डाॅ.राजेश माळी.


मार्गदर्शन करताना श्रीमती सुनिताराजे पवार


मार्गदर्शन करताना अरुण इंगवले.


लेखक प्राध्या.संतोष गोनबरेंचे स्वागत करताना कुवळेकर सर.


बहारदार निवेदनकर्ते डाॅ.राहूल मराठे.


आभार मांडताना विजय हटकर.

मान्यवरांसह मसाप लांजा टिम.


मार्गदर्शन करताना डाॅ.चोरगे सर.

डाॅ.तानाजीराव चोरगे दीपप्रज्वलन करताना.


८४ वर्षीय चिरतरुण लेखक संपादक गजाभाऊंची उपस्थिती.


माध्यमसमुहातील दखल :-





No comments:

Post a Comment