Wednesday, July 3, 2019

ऐतिहासिक साठवली गढीवर दुर्गवीर व शिवगंध प्रतिष्ठनच्या वतीने संवर्धन मोहिम संपन्न.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
     *लांजा*- छत्रपती शिवरायांच्या काळात जलमार्गे मालाची ने-आण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारे व त्या काळात तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र  म्हणून उदयास आलेले तालुक्यातील साटवली येथील ऐतिहासिक बंदर आणि गढीकडे पुरातत्त्व विभागाचे तसेच स्थानिकांचे दुर्लक्ष झाल्याने सद्यस्थितीत ही गढी अखेरची घटका मोजत आहे.लांजा तालुक्यातील ऎतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या गढिचे संवर्धन व्हावे व वर्तमान पिढीला तालुक्याचा समृद्ध वारसा ज्ञात व्हावा या दृष्टिने दुर्गवीर प्रतिष्ठान,शिवगंध प्रतिष्ठान, लांजा व साठवली, रुण  गावातील स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच साटवली किल्ला संवर्धनाच्या दृष्टीने  स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला  स्थानिकांनी देखील उस्फूर्त प्रतिसाद दाखविला.


     
 रत्नागिरि जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पश्चिम भागात व मुचकुंदि नदिकिनारि वसलेले साटवली हे गाव ऐतिहासिक काळात नावाजलेले बंदर होते. मुचकुंदी नदीचे उगमस्थान माचाळ येथे असून, ती खोरंनिनको प्रभानवल्ली, दसुरकोंडमार्गे साटवलीमध्ये येते.      छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात साटवली येथे माल उतरवण्यासाठी गढी म्हणजे एक छोटासा किल्ला होता.सदर गढि फाजल खान या सरदाराने बांधली असे इतिहासकार सांगतात.फार पूर्वी पासून सदर मुचकुंदी खाडीतुन व्यापार चालत असे.बाहेर ठिकाणाहून म्हणजेच कारवार,गोवा,मद्रास,मुंबई वैगेर ठिकाणाहून व्यापारी मालाची ये जा चालू होती.मोठमोठे पाडाव,मचवे मुचकुंदिच्या कुशीतुन रांगत असत,विसावा घेत असत. जवळच असलेल्या  पुर्णगड किल्ल्यातून  पाडावातून आणलेला माल साठवली येथे बांधण्यात आलेल्या धक्क्यावर  उतरवून साठवला जाई. समुद्रमार्गे आलेला हा माल मग लांजा तालुक्यातील अनेक गावात व प्रभानवल्लीमार्गे घाटावर विशालगड येथे बैलगाडिमार्फत नेला जात असे.  त्यामुळे साटवली बंदराला विशेष महत्त्व होते.

         साटवली या ठिकाणी व्यापारीही आपला माल उतरवत असत. माल उतरवण्याची व साठविण्याची व्यवस्था या ठिकाणी असल्याने या ठिकाणाला त्या काळी ‘बंदरसाठा’ या नावानेही संबोधिले जाई. माल साठवणीची जागा असलेलं हे गाव पुढं अपभ्रंश होऊन साटवली या नावाने ओळखले जाऊ लागले.

          शिवरायांच्या काळात व्यापाराच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असणा-या व त्या काळात एक प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीस आलेल्या या साटवली गढीची सध्या अतिशय दुरवस्था झाली आहे. किल्ल्याला पाच बुरुज तसेच आतमध्ये विहीर, सदरेचे अवशेष दिसतात. पुर्वी  किल्यात असणारी तोफ आज गावातील विठ्ठल मंदिरात ठेवलेली पहायला मिळते.  सध्या या भग्नावस्थेतील गढीला झाडा-झुडपांनी आच्छादले आहे. पडझड झालेले गढीचे प्रवेशद्वार, पशुपक्ष्यांचा वावर याच गोष्टी सध्या या ठिकाणी दृष्टीस पडतात. शिवाय ग्रामपंचायतीतर्फे भरणारा साप्ताहिक मासळी- कांदा बटाटा -भाजीपाला बाजार तेथेच भरतो.ग्रामपंचायत कराच्या रुपाने पैसा गोळा करते.मात्र यातून आतील साफसफाईच्या नावा..ने बोंबाबोंब आहे.एकेकाळी ऎतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या साठवली सुभ्याचा कारभार याच गढितून चालायचा.आज मात्र पुरातत्त्व खात्याच्या व स्थानिक नेतृत्वाच्या उदासिनतेमुळे हि ऎतिहासिक  गढि शेवटची घटका मोजते आहे.
त्यामुळे संवर्धनात सातत्य आणून हा किल्ला ( गढि)  जगासमोर  आणायला हवा.या हेतूने लांजा तालुक्यातील ऎतिहासिक वारसास्थाने जतन करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असलेल्या शिवगंध प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजु जाधव यांनी महाराष्ट्रातील दूर्ग संवर्धन चळवळित अग्रेसर असलेल्या दूर्गवीर प्रतिष्ठान शी संपर्क साधून साठवली गढी संवर्धन  मोहिमेचे आयोजन केले होते.या मोहिमेसाठी दूर्गवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष संतोष हसुरकर, सागर टक्के,प्रशांत डिंगणकर,अल्पेश पाटील,अमित शिंदे,मंगेश पडवळे,एकनाथ असवले, सुरेश उदरे,सुरक्षित कोकितकर,तेजस्वी रेवणे, रोहित बालडे,ओंकार डिंगणकर, प्रणीत बोले आदि शिलेदार साठवली गावी उपस्थित होते.
      यासोबत शिवगंध प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजु जाधव, प्रल्हाद साळुंखे,जयु सुर्वे,अंकिता जाधव, अनुष्का जाधव,गुणवंत जाधव, विशाल कांबळे, अमेय कांबळे, अजय सावंत,साई जेधे, दत्तप्रसाद कदम,अमेय चव्हाण,महेश सावंत,पप्पू मुळे,संदीप सावंत ,मानसिक कुरूप,निकिता कुरूप आदि शिलेदारांनीहि उस्फुर्तपणे या मोहिमेत सहभाग घेऊन साठवली गढी स्वच्छ करण्यात पुढाकार घेतला.

       दुर्गवीर व शिवगंध प्रतिष्ठानचे शिलेदार साठवली गढीच्या संवर्धन मोहिमेसाठी गावात दाखल झाल्याचे वृत्त समजताच स्थानिक ग्रामस्थ रमेश भालेकर,उदय चाळके, घन:श्याम संसारे,विवेक  संसारे, आनंद शेरे ,संदीप चव्हाण,राजेश शेरे,समीर नारकर,प्रकाश शेलार,राहुल माने,सचिन तरळ,सचिन कस्तुर,शिवप्रसाद नारकर, निनाद शेरे ,गंगाराम चाळले,मेस्त्री सर,सदानंद किल्लेकर, अविनाश पावसकर,महेश जाधव,मधूकर जाधव,राजु बाणे, अनिल तरळ, ओंकार गांगण,गॊरव पराडकर, गुड्डु पराडकर,संकेत पराडकर, इमाज देरवेश,समीर लांबे, शिवाजी पराडकर,असलाम बोबलाई, मुबीन दरवेश, हासनेन माफारि या ग्रामस्थानीही साठवली गढि ठिकाणी धाव घेतली. व सक्रियपणे गढीच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
      दूर्गवीरचे अध्यक्ष संतोष हासुरकर यांनी या गढिचे ऎतिहासिक महत्व व पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना मिळणारा रोजगार याचे महत्व विशद करित स्थानिक ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. साठवलीतील साठवली गढि,खानवलीतील खानविलकरांची शिवकालीन सदर,नदिपलीकडिल देवीहसोळचे आर्यादुर्गा मंदिर ,व कातळशिल्पे, जावडे येथील शैव- वैष्णव कालीन लेणी आदि ठिकाणे एकमेकांपासून जवळच्या अंतरावर असल्याने या सर्व स्थळांचा  नियोजनबद्ध विकास झाल्यास एकदिवसीय सहलीसाठी साठवली परिसर नवे डेस्टिनेशन म्हणून पुढे येऊ  शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . या पुढेही साठवली गढीच्या स्वच्छता ,संवर्धन  व विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन स्थानिक ग्रामस्थांनी दूर्गवीर प्रतिष्ठानला दिले.या कामी शिवगंध प्रतिष्ठान ने हि ग्रामस्थांना गढिच्या संवर्धनासाठी लागेल ते सहकार्य करण्याचा शब्द दिल्याने लवकरच शिवकालीन इतिहासाची साक्षीदार असलेली साठवली गढी पुन्हा एकदा उभारी घेईल हे नक्की.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    विजय हटकर
       लांजा

No comments:

Post a Comment