Friday, August 9, 2019


कै.नानासाहेब शेट्ये स्मारक समिती, साखरपा ता.संगमेश्र्वर या संस्थेचा २६ व्यक्ती व संस्था पुरस्कार सोहळा संपन्न.
-----------—--------—--------------------------------------
 "नानासाहेब शेट्ये साखरप्याचे लोकमान्य"
                                श्रीराम उर्फ भाऊसाहेब वंजारे.
------------------------------------------------------------------
श्री सुभाष लाड यांना व्यक्ती पुरस्कार व शिक्षण प्रसारक मंडळ, कीरबेट ता.संगमेश्वर या संस्थेला आदर्श संस्था पुरस्कार प्रदान.
-----------------------------------------------------------.

साखरपा:-
       संगमेश्र्वर तालुक्यातील साखरपा गावचे जेष्ट समाजवादी नेते कै.नानासाहेब शेट्ये यांनी साखरपाच नव्हे तर संगमेश्र्वर तालुक्यातील जनतेसाठी भरिव योगदान दिले असुन समाजाप्रती असलेल्या बांधिलकीमुळे त्यांच्या कार्याला  लोकमान्यता मिळाली होती व त्यामुळेच ते साखरप्याचे " लोकमान्य" असल्याचे मत व्यक्त करित,नानासाहेब व भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी नेमकि ०१ आॅगस्ट या एकाच दिवशी येते हे एक विधिलिखित साम्य असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक श्री श्रीराम उर्फ भाऊसाहेब वंजारे यांनी केले.
        कै. नानासाहेब शेट्ये यांच्या २६ व्या स्मृती दिनी ते बोलत होते. यावेळी कै.नानासाहेब शेट्ये स्मृती व्यक्ती व संस्था पुरस्काराचे वितरण त्यांच्या शुभहस्ते करण्यात अाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण समितीचे अध्यक्ष दत्ताराम शिंदे होते. सोबत  व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब शेट्ये ,गजाभाऊ वाघदरे, प्रा.आबाजी सावंत,प्राचार्य आर.एल.पाटील,  नानांचे सुपुत्र रामाकांत  शेट्ये,युयुत्सु आर्ते,सुभाष लाड,गणपत शिर्के,अशोक जाधव,किरण बेर्ड,रमाकांत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
      याप्रसंगी कै.नानासाहेब शेट्ये २६ वा व्यक्ती पुरस्कार राजापूर - लांजा तालुका नागरिक संघाचे उपाध्यक्ष , मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री सुभाष लाड यांना तर २२ वा संस्था पुरस्कार शिक्षण मंडळ किरबेट,ता संगमेश्र्वर या संस्थेला मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.व्यक्ती पुरस्कार प्राप्त सुभाष लाड यांनी सत्काराला उत्तर देताना रोजगार व व्यवसायाच्या संधी कोकणात उपलब्ध नसल्याने येथील तरूणांचा ओघ महानगराकडे वळला असुन गावं-खेडि ओस पडली आहेत.हि स्थिती बदलण्यासाठी गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे असे मत व्यक्त करित आपल्याला दिलेला हा पुरस्कार ह माझा नसून मला घडविणा- या रिंगणे गावातील सर्व  ज्ञात - अज्ञात ग्रामस्थांचा असुन या पुरस्कारासाठी माझी निवड करणाऱ्या संस्थेचे त्यांनी आभार मानले.तसेच संस्था पुरस्कार विजेत्या संस्थेच्या वतीने प्राध्यापक आबाजी सावंत यांनी पुरस्कार मिळाल्याने शिक्षण प्रसारक मंडळ ,किरबेटची जबाबदारी वाढली असुन पुढील काळात साखरपा परिसरातील विद्यार्थ्यांना  रोजगार मिळवून देणाऱ्या कॊशल्य शिक्षण देण्याचा  मानस व्यक्त केला.
     



या कार्यक्रमात पंचक्रोशीतील इयत्ता ०७ वी मधील प्रत्येक शाळेतील प्रथम,इयत्ता १० वी मधील प्रथम,इयत्ता १२ वी प्रत्येक शाखेतील प्रथम,पदवी परीक्षेतील प्रथम व स्काॅलरशिप प्राप्त सर्व  गुणवंत विद्यार्थ्यांचाहि प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. वेळी  मानपत्रांचे  वाचन व लेखन करणाऱ्या विजय हटकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष केसरकर व निवेदन गणपत शिर्के यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारुती शिंदे, रमाकांत शिंदे,बापु शेट्ये,विरेंद्र शेट्ये,रमाकांत शेट्ये ,दीपक शेट्ये,प्रसाद कोलते,अब्दुल हमीद खतीब ,मनोहर पोतदार, सुहास कदम,मिलिंद भिंगार्डे,संतोष केसरकर यांनी विशेष मेहनत घेतली
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment